काठावरील शेतकरी,वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे

काठावरील शेतकरी,वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे


लातूर : जिल्हयातील मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नदीवरील बॅरेजेसच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area ) सातत्याने पर्जन्यवृष्टी होत असल्याने येवा (Inflow) असाचा चालू राहिला तर केंव्हाही बॅरेजेस निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे बॅरेजेसमध्ये येणारा येवा बॅरेजमधून त्या त्या नदीपात्रात सोडावा लागणार आहे.


मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहिलेले नागरीक यांनी सावध रहावे जेणे करुन जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय अधिकारी लातूर पाटबंधारे विभाग क्र.-1 लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही