*उदयगिरी महाविद्यालयात क्रांती दिनानिमित्त महात्मा गांधींना अभिवादन*
उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशाला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी 'चले जाव' ची हाक दिली होती. त्याचे स्मरण म्हणून महात्मा गांधीना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सचिव प्रा. मनोहरराव पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर, उपप्राचार्य प्रा. आर. एन. जाधव (क. म.) पर्यवेक्षक प्रा. सी. एम. भद्रे, ग्रंथपाल प्रा.डॉ.एल. बी पेन्सलवार, प्रा. डॉ. जी.जी. जेवळीकर यांची उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा