अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे: कृषिमंत्री दादाजी भुसे

अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या


पाठीशी शासन खंबीरपणे उभे: कृषिमंत्री दादाजी भुसे


लातूर/उस्मानाबाद, :- राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे शेती पिकामध्ये पाणी साचले जाऊन सोयाबीन, तूर ,कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच काही पिकांना जागेवरच कोंबे आलेली आहेत. तरी प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेती पिकांचे पंचनामे त्वरित करून प्रस्ताव सादर करावेत. राज्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.


लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर व उस्मानाबाद या दोन्हीही जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा व कृषिविषयक योजनांच्या आढावा बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी संसदीय कार्य, पर्यावरण व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, उस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.


कृषी मंत्री भुसे पुढे म्हणाले की, लातूर व उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे पंचनामे करून नोंदी घ्याव्यात. या सर्व माहितीचे संकलन करून केंद्र शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच नुकसानीबाबत केंद्रीय पथकाने पाहणी करावी याबाबत केंद्राकडे मागणी केली जाणार आहे. राज्य शासन ही सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.


पी एम किसान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्यासाठी अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. महसूल व कृषी विभागाने यासाठी एक संयुक्त मोहीम राबवावी व या मोहिमेच्या माध्यमातून या योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी देऊन लातूर जिल्ह्यातील तीन लाख 17 हजार शेतकऱ्यांना तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा पहिला हप्ता मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सूचित केले.


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना ही देशातील एकमेव अशी योजना आहे की अत्यंत कमी कालावधीत व कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही राज्यातील जवळपास 30 लाख 50 हजार शेतकरी बांधवांना राज्य शासनाकडून 19 हजार 500 कोटी चा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना बँकाकडून पुनर्वित्त पुरवठा झालेला आहे का नाही याबाबतची माहिती प्रशासनाने घ्यावी व त्या प्रत्येक शेतकऱ्याला पुनर्वित्त पुरवठा मिळवून द्यावा असेही त्यांनी सूचित केले.


खरिप पेरणीच्या सुरुवातीस सोयाबीन बियाणांच्या उगवणीबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. या बियाणांची पडताळणी करुन अनेक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर काही कंपन्याचे परवाने रद्द करण्यात आले. त्यामूळे पुढील पेरणीकरीता शेतकऱ्यांनी स्वत:चे बियाणे तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे काढून ठेवावे याबाबत कृषि विभागाने प्रबोधन करावे. माननीय मुख्यमंत्री यांनी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरु केली असून ग्राहकांची जी मागणी आहे, त्याच पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे यासाठी प्रयत्न केले जाऊन शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे व ग्राहकांनाही शेतकऱ्यांचा थेट माल पोहोच केला जाणार असल्याची माहिती श्री. भुसे यांनी दिली.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेअंतर्गत मराठवाडा व विदर्भाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी शिक्षण घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना सक्षम केले जाणार आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला झाला असल्याने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार आहे, त्यामुळे प्रशासन व कृषी विभाग यांनी खते व बियाण्याच्या तयारीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी असे निर्देश श्री भुसे यांनी दिले.


बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरु आहे. यासाठी गोडाऊन, शितगृहे, वाहतूक, प्रक्रीया उद्योग आदीबाबत नियोजन करुन शेतकरी उद्योजक निर्मित उत्पादन करण्यात येणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगून बँकांनी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. तसेच बँकाकडून पीक कर्जाच्या वेळेस शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे, त्याबाबत बँकांनी योग्य ती दक्षता घेऊन सर्व शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक द्यावी अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले. व यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी निर्देशीत केले.


लातूर जिल्ह्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित सुरू करण्यात आली त्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. तसेच लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार घाडगे पाटील, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यु पवार, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नुकसानीचे पंचनामे त्वरित करणे, पीक विम्याचे ऑफलाईन अर्ज स्वीकारणे, पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, शेततळे, उस्मानाबाद व लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करणे आदी मागण्या करून त्याबाबत सकारात्मक विचार करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी असे आवाहन केले.


प्रारंभी लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गवसाने यांनी लातूर जिल्ह्यात सरासरीच्या 108 टक्के पाऊस झालेला असून 60 पैकी 24 महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे व एकूण 99 हजार 551 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. उस्मानाबाद चे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या 103 टक्के पाऊस झालेला असून 21 मंडळात शंभर टक्के पाऊस झालेला असून सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती दिली तर 41 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे त्यांनी सांगितले.


*वांजरवाडा ता. जळकोट येथील पीक नुकसानीची पाहणी*


कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील अतिवृष्टीने व सततच्या पावसाने शेती पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष शेतावर जाऊन केली. या भागातील सोयाबीनच्या पिकात पावसाचे पाणी साचल्याने पिके पिवळी पडली असून सोयाबीनच्या शेंगांना कोंबे आल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याबरोबरच कृषि सह संचालक श्री. जगताप व उदगीरचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. तीर्थकर उपस्थित होते.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image