शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपयाचे अनुदान द्यावे: भाजपाची मागणी


उदगीर : उदगीर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी उदगीर च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.


यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे खरीप पीक व ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पंचनामे करून सरसकट 50 हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


हे निवेदन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, ऍड. दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, दिलीप मजगे , लक्ष्मण भालके , नारायण मिरगे, रवी काळा ऍड. महेश मळगे, प्रमोद मुदाळे आदी उपस्थित होते.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही