*बिएलओना त्वरित मानधन द्या शिक्षक समितीची मागणी ......*

*बिएलओना त्वरित मानधन द्या शिक्षक समितीची मागणी ......*


 


निलंगा: आज दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती निलंगा यांच्यावतीने तहसीलदार साहेब यांना बीएलओच्या अडचणी संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यात मागील वर्षाचे थकित मानधन त्वरित देण्यात यावे, तसेच बीेलओची कामे फक्त शिक्षकांना न देता सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना समसमान द्यावे, तसेच शिक्षक बीएलओना शैक्षणिक ताण खूप असल्याकारणाने त्यांची बीेेेएलओची कामे रद्द करण्यात यावी. व स्वतंत्र आस्थापना निर्माण करण्यात यावी .तसेच जे शिक्षक covid-19 या कामात नियुक्त केले आहेत त्यांना 50 लाखाचे कव्हरिंग देण्यात यावे. या प्रमुख मागण्या होत्या. यावेळी शिक्षक समितीचे नेते तसेच जिल्हा परिषद जिल्हा परिषद लातूर चे स्वीकृत सदस्य अरुणजी सोळुंके तालुकाध्यक्ष संजय कदम, सचिव गणेश गायकवाड, संचालक लखनेे , बी एल ओ सुनील टोपे, बी.एम पाटील, सुभाष चौधरी ,किरण गोंदगे, भास्कर सोळुंके संतोष सुर्यवंशी ओम गेेंदेवाड, मुरमे सर, शिवा राठोड व शिक्षक समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते .त्याप्रसंगी तहसीलदार साहेब यांच्या वतीने अडसूळ साहेबांनी (नायब तहसीलदार निलंगा) यांनी निवेदन स्वीकारले.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज