प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावा -राज्यमंत्री संजय बनसोडे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावा -राज्यमंत्री संजय बनसोडे


लातूर:- जिल्हृयामध्ये यावर्षी आजअखेर सरासरीच्या 105% पाऊस पडलेला असून काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी सुध्दा झालेली आहे. तसेच मागील 10 दिवसापासुन सतत पाऊस होत असून यामूळेही काही ‍ठिकाणी पुर/क्षेत्र जलमय होऊन पिकांचे नुकसान होत आहे. यानुषंगाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे वर नमूद कारणाने नुकसान झालेले आहे असा कोणताही शेतकरी पंचनाम्यामधून सूटणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत प्रशासनास सूचना दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत अर्ज करावा, असे आवाहन संसदीय कार्य, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.


जिल्हृयामध्ये पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तीक शेतातील पिकाचे नुकसान झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने पिक नुकसान पूर्वसुचना देण्याकरीता सूविधा उपलब्ध आहे. पिक विमा योजनेमध्ये शेतात पाणी थांबून राहील्यामूळे झालेले नुकसान व पूराचे पाणी शेतात घूसल्याने झालेले नुकसान या दोन बाबींमूळे झालेले नुकसानी संदर्भात नुकसान भरपाई मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांचे वरील कारणाने नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. ऑफलाईन अर्जासाठी प्रत्येक तालूक्याच्या तालूका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये विमा कंपनीचा प्रतिनिधी उपलब्ध आहे. या संबंधाने शेतकरी या प्रतिनिधीकडे अर्ज करु शकतात अर्जासोबत पिक विमा भरल्याची पावती व 7/12 उतारा कागदपत्र सादर करावीत.


शेतकरी ऑफलाईन अर्ज बँक/महसूल विभाग/कृषि विभाग यांच्याकडेही करु शकतील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Crop Insurance मोबाइल ॲपचा वापर करुन नुकसानीची सूचना देता येईल.


तरी ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत ऑफलाईन/ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी ‍जिल्हृयातील शेतकऱ्यांना केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज