अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित व्हावेत-आ. संभाजी पाटील*

*अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित व्हावेत-आ. संभाजी पाटील* निलंगेकर*


*घरात विलगीकरण असणार्यांचा दररोज आढावा घ्यावा*


निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा विधानसभा मतदारसंघतील तीनही तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन भरपाई देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याचे निर्देश संबधित अधिकर्यांना देण्यात याव्यात. तसेच जे कोरोना रुग्ण घरात विलगकरण करण्यात आलेले आहेत या रुग्णाचा आढावा घेऊन दिवसातून किमान एकदा पाहणी व तिनदा विचारणा करण्यात यावी अशा सुचना माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकार्यांना केल्या.सध्या जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरु आहे. या अतिवृष्टी चा आढावा व सध्या सुरु असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनाचा आढावा घेण्यासाठी येथील उपजिल्हाकार्यालयात माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षेतेत आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला उपजिल्हाअधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, सुरेश घोळवे, ए.टी. जटाळे, शिरुर अनंतपाळचे एन.एस. शेरखाने, देवणीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. कदम, कृषी अधिकारी संजय नाबदे, ए.बी. चव्हाण, आर.एस. कदम, एस.बी आडे, नायब तहसीलदार ए.ए. महापूरे , चेअरमन दंगडू सांळूके आदी उपस्थित होते.सध्या राज्यसह जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यातील पिकांच्या झालेल्या नुकसनीची पाहणी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्व:ता शेती बांधावर जाऊन केली आहे. तसेच जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा परिषद यंत्रणे मार्फत करण्यात आली आहे. या पाहणी दौर्यानंतर आज येथील उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी यंत्रणे कडून करण्यात आलेल्या नुकसानीचा अहवाल घेऊन सर्वाना त्वरीत पंचनामे करण्याचा सुचना त्यांनी केल्या. त्याच बरोबर अतिवृष्टीने देवणी तालुक्यातील फुटलेल्या पाझर तलावातील पाण्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासना मार्फत नुकसान भरपाई देण्यासाठी शासनकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाय योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यात कोरोनाने होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रुग्णांशी सुसंवाद साधून योग्य औषधपोचार करण्यात यावेत. तसेच संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णाची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. तसेच त्याची योग्य काळजी घेऊन त्यांच्या उपचाराकडे वरिष्ट अधिकार्यांनी लक्ष देण्याच्या सुचना आ. निलंगेकरांनी यावेळी केल्या आहेत. याचबरोबर घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णासाठी एक आरोग्य पथक तयार करुन त्यांची पण दिवसातून किमान एकदा तपासणी व फोन द्वारे तीनदा विचारणा करण्यात यावी अशीही सुचना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केल्या.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image