माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत... राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून सुमठाणा येथे नागरिकांची आरोग्य तपासणी*  

*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत...


राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून सुमठाणा येथे नागरिकांची आरोग्य तपासणी*



 


लातूर/उदगीर,दि.26 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात दिनांक 15 सप्टेंबर 2020 पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी आरोग्य पथकाकडून केली जात आहे. 


     उदगीर तालुक्यातील सुमठाणा येथे पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांकडून "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत कशा पद्धतीने गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करून त्याच्या नोंदी कशा ठेवल्या जात आहेत याची माहिती जाणून घेतली व या वेळी श्री बनसोडे यांच्या हस्ते सुमठाणा ग्रामस्थांची प्रातिनिधिक स्वरूपात स्वतः आरोग्य तपासणी करण्यात आली.


     यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी या मोहिमेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आरोग्य तपासणी करावी. शहरी व ग्रामीण भागातील एक ही नागरिक आरोग्य तपासणी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी व लातूर जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी शासन व प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. 


      लातूर जिल्ह्यात 1हजार 535 आरोग्य पथकांची स्थापना प्रशासनाने केली असून या पथकामध्ये 199 पथके शहरी भागासाठी असून 1336 पथकामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास 4 लाख 29 हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी या मोहिमेअंतर्गत आरोग्य पथकाकडून दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2020 व दिनांक 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर 2020 या दोन टप्प्यात केली जाणार आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते अहमदपूर येथून दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आलेला आहे.


                ********


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*