हैद्राबाद मुक्तीसंग्रामाची लढाई ही स्वातंत्र्याचा हुंकार : कोमसापच्या व्याख्यानमालेत गुडसूरकर यांचे प्रतिपादन   

हैद्राबाद मुक्तीसंग्रामाची लढाई ही स्वातंत्र्याचा हुंकार


कोमसापच्या व्याख्यानमालेत गुडसूरकर यांचे प्रतिपादन 



ठाणे (प्रतिनिधी)


मराठवाडामुक्तीचा लढा हा केवळ सत्तांतराचा नव्हता तर सरंजमशाहीविरोधातील लोकशाहीवादी वृत्तीने दिलेला लढा होता.मुक्तीलढ्याला यश होऊन जुलमी निजामी सत्तेचा शेवट ही भारतीय स्वातंत्र्याची पूर्ती होती असे मत अभ्यासक धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले.


    *कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती* आयोजित *"मराठवाडा मुक्तीसंग्राम:स्वातंत्र्याची परिपूर्ती"* या विषयावर आयोजित फेसबुक लाईव्ह व्याख्यानात ते बोलत होते."भारतीय स्वातंत्र्यलढ्याएवढाच मराठवाडा मुक्तीसंग्रामही महत्वाचा होता.एकवीस हजार स्वातंत्र्यसैनिक,शंभर सशस्त्र कँप,लढ्यात तन मन आणि धनाने सहभागी होऊन प्राण तळहातावर घेऊन लढणारी सामान्य माणसं यांच्या त्यागाचं योगदान मोजले जाऊ शकत नाही एवढे मोठे आहे.येथील जनतेने जुलमी राजवटीविरूद्ध उठविलेला आवाज स्वतंत्र भारताने ऐकून या लढ्याला दिलेले बळ हे भारतीय स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरले.देशाच्या मध्यस्थानावरील हा जुलमी हैदोस वेळीच रोकला गेला नसता तर तो स्वतंत्र भारतासाठी अत्यंत धोक्याचा होता.या लढ्याला जातीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न जुलमी सत्तेने केला पण स्टेट काँग्रेसच्या नेत्यांनी वैचारिक भूमिका घेऊन तो उधळवून लावला.त्यामुळे या लढ्याला वेगळा रंग दिला जाऊ नये अशी अपेक्षा गुडसूरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.


 स्वातंत्र्योत्तर काळातही मराठवाड्याच्या नशिबी कायम संघर्ष राहिला आहे.या स्वातंत्र्याच्या लढाईचा विसर पडतो की काय ? अशी परिस्थिती असून महाराष्ट्राच्या नव्या पिढीला हा इतिहास समजून सांगण्याची गरज गुडसूरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.निजामी राजवटीने व रजाकारांनी सत्तांध होऊन केलेला अनन्वित अत्याचार हा मानवतेवरील कलंक होता असे ते पुढे बोलताना म्हणाले.स्वामी रामानंद तीर्थ,बाबासाहेब परांजपे व गोविंदभाई श्राॕफ या त्रिमूर्तींनी या लढ्याला दिलेले वळण हे महत्त्वाचे ठरले असे त्यांनी सांगितले.संयोजक प्रा.दीपा ठाणेकर यांनी मराठवाड्याबाहेरील महाराष्ट्रासमोर हा इतिहास उजळण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्तविकातून सांगितले.आकाश नलावडे,वैभव पाडावे,सांब शास्री यांनी यासाठी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*