भिवंडी दुर्घटनेत हाळी येथील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश
हाळी हंडरगुळी - भिवंडी येथील इमारत दुर्घटनेत उदगीर तालुक्यातील हाळी येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे हाळी गावावर शोककळा पसरली. मंगळवारी सायंकाळी पर्यंत सहा पैकी चार जणांचे मृतदेह मिळाल्याचे कुटूंबियांनी सांगीतले.
हाळी येथील शेख कुटूंबातील आरीफ युसूफ शेख हा तरूण पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई येथे आठ वर्षांपूर्वी पत्नी व तीन मुलांस गेला होता. तो खाजगी गाडीवर चालक म्हणून कामाला लागला. त्याचा संसार आनंदात सुरू होता. गावी असलेल्या भावालाही त्याने महिनाभरापूर्वी कामासाठी भिवंडीला बोलावून घेतले. राहण्यासाठी तो भिवंडी येथील जिलानी इमारतीत रहायला होता. मात्र नियतीला ते मान्य झाले नाही. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळली. त्यात इतर कुटूंबासह जिलानीचे कुटूंब गाडले गेले. त्यात कुटूंबप्रमुख आरीफ युसूफ शेख ३२ वर्षे, नसीमा आरीफ शेख २७ वर्षे, निदा आरीफ शेख १० वर्षे, सादिया आरीफ शेख ७ वर्षे, हसनैन आरीफ शेख ३ वर्षे, सोहेल युसूफ शेख २२ वर्षे यांचा त्यात समावेश आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच हाळी गावावर शोककळा पसरली. कुटूंबातील काही सदस्य तात्काळ भिवंडीकडे रवाना झाले. मंगळवारी पाच वाजेपर्यंत चार जणांचे मृतदेह सापडल्याचे कुटूंबियांनी सांगीतले. दरम्यान एकाही मयताला गावी न आणता येत असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
* दोनच मुले - युसूफ शेख हे हाळी येथे मंजुरी करून उपजीविका भागवायचे यास दोन मुले व दोन मुली होत्या. दोन मुलींचे व एका मुलाचे लग्न झाले होते. मात्र दोन्ही मुले व मुलाचे मुले मृत्यू पावली असल्याचे सांगितले जात आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा