18 वी ओव्हर 

18 वी ओव्हर


 


दिनांक 27 सप्टेंबर 2020, स्थळ वाळवंटातील शारजाह, वेळ रात्री 10 30 नंतर कुठली तरी.....निमित्त किंग्स एलेवंन पंजाब विरुद राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान खेळला गेलेला क्रिकेट सामना...बैट्समन राहुल तेवतीया....मागील एक तासापासुन चाचपडत खेळणारा...कधी आत्मविश्वास कमी तर कधी टाइमिंग चुकायचे...पुर्ण प्रयत्न करुनही कधी नशीब साथ देत नव्हते , इतकेच काय एखादा चेंडू अगदी पुर्ण कौशल्य पणाला लावून मारला तरी क्षेत्ररक्षक अचुक पकडत असे, समलोचंक पूरेपर टिका करताना म्हणाले की राहुल परत का येत नाही, त्याच्या कुर्मगती खेळामुळे राजस्थान रोयल्स संघ सामना गमावणार आहे, सोशल मीडिया वर प्रचंड टर उडविली जात होती, आव्हान प्रत्येक चेंडू गणिक अधिक अशक्यप्राय होत चालले होते,


प्रचंड मानसिक दबावाखाली राहुल पोहचला होता आणि आता शेवटच्या 3 ओव्हर मधे 50 धावा करायच्या होत्या......म्हणजे 18 चेंडू आणि आणि 51 धावा करायच्या आहेत....समालोचकानी किंग्स एलेवन पंजाब ला अगदी विजयी घोषीत केलेले...


राहुल तेवतीया....पहिल्या 19 चेंडूत केवळ 8 धावा केलेल्या...सर्वांच्या टीकेचा धनी ठरलेला...चाचपडत खेळणारा अगदी असे वाटावे की कॉलनीतील एखादा तेंडुलकर यापेक्षा चांगला खेळतो इथ पर्यंत टिका....


आणि 18 वी ओव्हर घेउन वेस्ट इंडिज चा गोलंदाज क्वाट्रेल डाव्या हाताने मारा करायला आला आणि राहुल सुद्धा डाव्या हाताने उजवी खेळी करुन गेला....पहिल्या चार चेंडूवर चार षटकारांची बरसात...स्क्वैयर लेग वरुन..लॉंग ऑफ़...लॉंग ऑन...आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा एक षटकार.....6 चेंडूत तब्बल 30 धावा....पहिल्या 8 धावासाठी 19 चेंडू घेणारा राहुलला मात्र पुढच्या 30 धावासाठी केवळ 6 चेंडू पुरेसे होतात, .....हातातुन गेलेला सामना सहज जिंकला जातो ...आणि टीकेचा शिरोमणी ठरलेला रोहित कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघतो.......


आयुष्यात काय वेगळे असते या शिवाय...


कधी सामान्य यश मिळवायला खुप जगडावे लागते....मात्र हे जगडणे तुम्हाला नकळ्त स्थिर आणि मजबूत करत असते, राहुल पहिले 19 चेंडू खेळला, जरी चाचपडला तरीही त्या चेंडू खेळल्याने तो खेळपट्टीवर स्थिरावला, त्याचा आत्मविश्वास दुणावला, आणि सह्याद्री एवढा जरी दबाव होता तरी त्याची सकारात्मक मनोवृत्ती हिमालय इतकी मोठी ठरली,


प्रत्येकाला परमेश्वर 18 वी ओव्हर खेळायला देतच असतो मात्र त्यासाठी टीकेचे, अपमानाचे,अविरत प्रयत्नाचे, निराशेचे , प्रतिकूल परिस्थीतीचे, अपयशाचे, अवहेलनेचे , वेदनेचे, कधी कधी स्वकीयांचे टिपणीचे, अपेक्षाभंगाचे, विश्वासघाताचे, अनपेक्षित संकटांचे 19 चेंडू अत्यंत सकारात्मक वृत्तीने आणि प्रचंड आत्मविश्वासाने स्वतची विकेट अजिबात पडू न देता ( सेल्फ विकेट चा अजिबात विचार न करता) खेळून काढावे लागतात कारण हे 19 चेंडू तुम्हाला इतके सक्षम बनवतात की कुणीही 18 वी ओव्हर घेवुन आला तरी तुम्ही राहुल तेवतीयाच असतात आणि विजयाचे श्रेय तुमचे कुणीही हिरावून घेवू शकत नाही 


.....कोविडचा हाहाकार, आर्थिक मंदी , नितीमूल्यांची जालेली होळी, दुरावलेले नाते संबंध, सामाजिक जीवनात पसरलेले नैराश्य,


निसर्ग वादळे , जाती धर्माच्या दुर्दैवाने उभारल्या गेलेल्या भिंती, प्रचंड महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे वाजलेले तिन तेरा आणि वैद्यकीय संस्थांच्या उघड्या पडलेल्या मर्यादा, माणुसकीच्या पलिकडे गेलेल्या राजकीय महत्वकाक्षा, शासकीय संस्था कडून होणारी प्रचंड दफ्तर दिरंगाई, कोसळत असनारय इमारती आणि बळी पडणारे निरपराध नागरीक, हे सर्व ते 19 चेंडू आहेत आणि आपल्याला ते अत्यंत संयमाने खेळून काढायचे आहेत,कुठल्याही परिस्थीतीत आणि ते सुद्धा स्वतची विकेट अबाधित ठेवूनच, हे दुख माज्याच नशिबी का,हा चेंडू माज्याच नशिबी का ही तक्रार तर अजिबात नकोय कारण तो चेंडू त्या 19 चेंडूचा भाग आहे हे परवाच राहुलने आपल्याला दाखवुन दिले आहे. सेलिब्रेशन करायचे आहे न, जिंकल्याचा आनंद घ्यायचा आहे न, मिरवायला आवडते न तुम्हाला विजय मिळाल्यावर आपल्या प्रिय जनांना घेवुन....मग कसल्याही परिस्थीतीचं टेंशन न घेता अत्यंत सहज पने हे चेंडू खेळून काढा कारण ईश्वरं तुमची वाट बघतोय 18 वी ओव्हर घेवुन, तुम्हाला जीवनाचा चषक उंचावताना बघायचे आहे 


मला या प्रसंगी राजकुमारचा एक संवाद आठवतोय, तो म्हणतो 


" जानी, हम तुम्हे मारेगे और जरुर मारेगे,


लेकीन वो जगह भी हमारी होगी 


बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी, लेकीन हमे सही वक्त का इंतजार होता है तबतक तूम जीतनी उछलकूद कर सकते हो वो कर लो....


 


प्रा.प्रशांत सी. जोशी 


An ISO Consultant 


औरंगाबाद 9822431780


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image