उदगीर मतदारसंघातील अनेक विकास कामे वर्षेभरात मार्गी -राज्यमंत्री संजय बनसोडे  --------------------- मतदार संघासाठी कोठयावधी रुपयांच्या प्रस्ताविक विकास कामासाठी भरीव निधी 

उदगीर मतदारसंघातील


अनेक विकास कामे वर्षेभरात मार्गी -राज्यमंत्री संजय बनसोडे 


---------------------


मतदार संघासाठी कोठयावधी रुपयांच्या प्रस्ताविक विकास कामासाठी भरीव निधी


-----------------------


 लातूर: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेच्या वेळी राज्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. मागील एक वर्षात उदगीर व जळकोट शहराच्या विकासाला गती मिळाली असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले गेले आहेत. या शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही यापुढील काळात मराठवाडयात विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.


 यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, मागील वर्षी उदगीर जळकोट येथील जनतेने मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. महाविकास आघाडीत राज्यमंत्री म्हणून काम करीत असताना एका वर्षातच शहराच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.


  उदगीर शहरातील साहित्य प्रेमीसाठी संस्कृती भवन साठी 9 कोटी, लिंगायत भवन 2 कोटी, शादीखाना 2 कोटी, बौध्द विहार 2 कोटी ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा साठी 12.50 कोटी,डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत उदगीर जळकोट तालुक्यात 4.75 कोटी, देवर्जन-दावणगाव रस्ता 2 कोटी, हाळी-डिग्रज 03 कोटी ,गुडसुर -घोसी 4.50 कोटी ,येणकी-माणकी रस्ता 08 कोटी ,जळकोट येथे नवीन विश्रामगृह बांधकाम 5.45 कोटी जळकोट प्रशासकीय इमारत 14.99 कोटी. उदगीर विश्रामगृह विस्तारीकरण 3.77 कोटी उदगीर प्रशासकीय इमारत 14.99 कोटी 


 तसेच उदगीर ट्रामा केअर युनिट दुसरा टप्पा 2.77 कोटी उदगीर सामान्य रुग्णालयात अद्ययावत आँक्सिजन टँक 70 लाख,जळकोट सामान्य रुग्णालय दुरुस्ती 32. लाख जळकोट रुग्णालयाकडे जाणारा रस्ता 50 लाख, उदगीर सामान्य रुग्णालयाकडे(धन्वंतरी महाविद्यालय) रस्ता 50 लाख यासोबतच अनेक वर्षी पासून प्रलंबित असलेली तहसील कार्यालय याची इमारत 9 कोटीची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 


 अशा विविध अनेक विकास कामासाठी वर्षभरात निधी देऊन कामे मार्गी लावले आहेत.या कामाना प्रशासकीय मान्यता मिळाली असुन या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे . या सोबतच उदगीर येथील नियोजित एमआयडीसीचा प्रस्ताव उच्चसतरीय समिती समोर दाखल केला आहे. लवकरच याला मान्यता मिळणार आहे याबाबतची अधिसूचना लवकरच प्राप्त होईल,अनेक वर्षी पासून प्रलंबित असलेला आष्टा मोड ते उदगीर रस्त्याचे काम सुरू झालेले आहेत. तसेच तिरु नदीवर बॅरेजसचा प्रस्तावाल तत्वाता मान्यता दिली आहे. आमदार फंडातून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मघ्ये दहा अँबुलस देण्यात आले आहेत. मगरुळ येथे प्राथमिक आरोग्य क्रेंद्रस मान्यता, हत्ती बेटास पर्यटनाचा ब दर्जा, उदगीर येथील क्रिडा संकुलास 5 कोटी मंजूर ,जळकोट येथे क्रिडा संकुल मंजूर करण्यात आले अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिली आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image