शेतकऱ्यांनी जोडधंदे करून उन्नती साधावी : गोविंदराव भोपणीकर

शेतकऱ्यांनी जोडधंदे करून उन्नती साधावी : गोविंदराव भोपणीकर


देवणी...... जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली पाहिजे शेतीला पूरक असे जोड धंदे केले तर हा अर्थिक उन्नती चा एकमेव मार्ग असल्याचे मत गोविंदराव भोपणीकर यांनी गुरधाळ येथील शेतकरी यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.


गुरधाळ येथील शेतकरी शेतकरी यांनी शेततळ काढून शेती ओलिताखाली आणून भरघोस उत्पादन व शेतीला पूरक मछ व्यवसाय करीत असल्याचे कळताच गोविंदराव भोपणीकर यांनी त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेततळ्याची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले याचं व्यवसायाच्या संबंधित कुकुट पालन कोल्हापूर विभागात मोठ्या प्रमाणात केले जाते तश्या प्रकारे काही करता आले करा असेही भोपणीकर यांनी सांगितले.


गोविंदराव भोपणीकर हे शेतकऱ्यांविषयी दूरदृष्टी असणारे नेते आहेत त्यांना शेतकऱ्यांविषयी आत्मीयता आहे शेतकऱ्यांचा विकास तर संपूर्ण देशाचा विकास समजून शेतकरी याना आपणास मदत करता येईल काय म्हणून शेतीला लागणारे विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान युक्त अवजारे उपलब्ध करून देण्याचा आपला माणसं असून देवणीत ऍग्रो एजन्सी घेतली आहे ती लवकरच देवणी शहरात चालू होणार आहे तेव्हा तालुक्यातील शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात यांचा फायदा होणार आहे त्यामुळे भोपणीकर हे शेतकऱ्यांविषयी दुरदृष्टी ठेवणारे नेते आहेत हे नक्की त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image