माजी पं. स. सदस्य मुरलीधर अंचूळे यांचा सत्कार

माजी पं. स. सदस्य मुरलीधर अंचूळे यांचा सत्कार


निलंगा: येथील माजी पंचायत समिती सदस्य श्री. मुरलीधरजी अंचुळे यांच्या सजगतेमुळे आपल्या निलंग्यात निरागस बालिकांचे अपहरण टळले. त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेबद्दल निलंगावासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


एका अज्ञात इसमाने दोन बालिकांना जेवणाचे आमिष दाखवून, घरी कोणी नसताना रिक्षात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. गावाबाहेरील धावत्या रिक्षात रडणाऱ्या लहान मुली पाहून, त्या मार्गाने आपल्या गावी निघालेल्या श्री. मुरलीधर अंचूळे यांना एकंदरीत प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी सदर इसमाची थांबवून चौकशी केली असता, त्याने पळ काढला. दोन्ही मुलींना पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुलींना त्यांच्या आई वडिलांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे गुरुवारी दुपारी गुन्हेगारास पकडण्यात यश आले आहे.


मुरलीधर अंचूळे यांनी दाखविलेल्या या सतर्कटेबद्दल युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


समाजातील प्रत्येकाने मुरलीधर अंचूळे यांच्याप्रमाणे सजगता दाखवली तर महिलांवर, बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना तात्काळ आळा बसेल अशी अपेक्षा अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.


 


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज