हतरस येथील पीडित महिलेस न्याय द्यावा : महाराष्ट्र संघर्ष अभियानचे निवेदन

हतरस येथील पीडित महिलेस न्याय द्यावा : महाराष्ट्र संघर्ष अभियानचे निवेदन


उदगीर: उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातीच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र संघर्ष अभियान या संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.


हतरस येथील एका अनुसूचित जातीच्या महिलेवर चार ते पाच जणांनी अमानुष अत्याचार केला. यात गंभीर जखमी होऊन ही महिला उपचारादरम्यान मृत पावली आहे. या घटनेमुळे अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवावे अशी मागणी महाराष्ट्र संघर्ष अभियानाचे अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी यांच्यासह सुनील गोडबोले, मनोहर गायकवाड, मारोती तलवाडकर, चंद्रपाल कांबळे, विजय भालेराव यांनी केली आहे.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही