बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता

बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला


माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता


उदगीर (विक्रम हलकीकर): अनेक दिवसांपासून उपाशी राहिल्याने रस्ताच्या कडेला बेवारशी इसम पडल्याची माहिती मिळताच उदगीर येथील माजी नगरसेवक अहमद सरवर तत्परतेने घटनास्थळी दाखल होऊन संबंधित इसमावर वेळेवर योग्य उपचार झाल्याने त्या इसमाचे प्राण वाचले आहेत. सरवर यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाजातून त्यांचा गौरव केला जात आहे.


दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उदगीर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी उदगीरचे माजी नगरसेवक अहमद सरवर यांना दूरध्वनीवरून डोंगरशेळकी तांडा येथे जवळपास अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एक अनोळखी इसम रस्त्याच्या कडेला पडला असल्याचा निरोप दिला. हा निरोप मिळताच अहमद सरवर यांनी त्वरित मिर्झा पाशा बेग व अन्वर शेख यांच्यासह अभिषेक बरुरे रेड्डी, राहुल पुडं आणि इतर तांडा समाजाच्या साह्याने त्वरित ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोचले. त्याठिकाणी गेल्यावर ही व्यक्ती दोन दिवसापासून याच ठिकाणी असल्याचे समजले. श्वास चालू होता मात्र ती व्यक्ती काहीच बोलत नव्हती. आजूबाजूने जाणाऱ्या व्यक्तींनी तो झोपला असेल असे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात आले. त्याची परिस्थिती पाहता त्याला ताबडतोब वैद्यकीय सेवेची गरज आहे ते लक्षात येताच अहमद सरवर यांनी त्वरित उदगीरचा सरकारी दवाखाना गाठले. त्यांनतर सोशल मीडियावर अनोळखी इसम बेवारस पडलेली असल्याची माहिती दिली. अनेकांनी चौकशी सुरू केली. काही वेळात संबंधित व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्या इसमाच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. दरम्यानच्या काळात त्वरित सरकारी दवाखान्यात दाखल करून त्यांना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांनी देखील तत्परता दाखविली असल्याचे अहमद सरवर यांनी सांगितले. 


सलग चार-पाच तासाच्या उपचारानंतर पेशंट चांगल्या स्थितीत आला, परंतु त्यांना अत्यावश्यक सेवेची गरज असल्यामुळे उदगीरच्या सरकारी दवाखान्यांमध्ये ICU उपलब्ध नसल्यामुळे त्यांना लातूरला हलविण्यात आले असून पुढील उपचार हे लातूर येथील शासकीय दवाखान्यांत चालू झाले.


माजी नगरसेवक अहमद सरवर यांनी दाखविलेली तत्परता व सोशल मीडियामुळे नागरिकांकडून झालेली मदत यामुळे एक इसमाचा जीव वाचविण्यात आला असून सरवर यांच्या तत्परतेचे समाजातून कौतुक होत आहे.


डॉक्टरांनी वेळेवर उपचार केल्यामुळे आपण सदरील इसमाचा जीव वाचवू शकलो असल्याची भावना माजी नगरसेवक अहमद सरवर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image