तोगरी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

 


तोगरी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश


उदगीर: या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोगरी या शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती( इयत्ता पाचवी )परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.


गायत्री महेश अलीबादे, पटणे श्रुती अंतेश्वर, सौदागर माहीन दिलदार, संगेवार चैतन्य सचिन, गायकवाड श्रद्धा बालाजी हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. 


पात्र विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी श्रीमान भगवानराव फुलारी, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमान शिंदाळकर, केंद्रप्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे, मुख्याध्यापक दापके एल .व्ही., शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडितराव म्हादा, उपाध्यक्ष महेश तेलंग यांनी अभिनंदन केले आहे.


यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दापके एल .व्ही.,वर्गशिक्षक कुंभार आर .जी., पाटील एस .बी., साळुंखे व्ही .एस., राम शेट्टी यु. एस., बिरादार एच .जी., धनुरे के .जी., आंबे नगरे एल .के. यांचे मार्गदर्शन लाभले.


टिप्पण्या
Popular posts
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज