*राजस्थानातील ब्राह्मण पुजार्याच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत व्हावा* *ब्राह्मण समाजाच्या वतीने निलंगा उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन*

*राजस्थानातील ब्राह्मण पुजार्याच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत व्हावा*


*ब्राह्मण समाजाच्या वतीने निलंगा उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन*


निलंगा/प्रतिनिधी ः- राजस्थान राज्यात असलेल्या करौली जिल्ह्यातील सपोटरा तालुक्यात असलेल्या बुकना येथील ब्राह्मण पुजारी बाबुलाल वैष्णव याची जीवंत जाळून हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास आत्महत्या असल्याचे भासून दडपविण्याचा प्रयत्न होऊ लागलेला आहे. या घटनेमुळे केवळ राजस्थान मधीलच नव्हे तर संपुर्ण देशभरातील ब्राह्मण समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा तपास निपक्षपणे व्हावा याकरीता सीबीआयच्या मार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने निलंगा येथील उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे.राजस्थान राज्यात असलेल्या करौली जिल्ह्यातील सपोटरा तालुक्यात असलेल्या बुकना येथील ब्राह्मण पुजारी बाबुलाल वैष्णव याची जीवत जाळून हत्याचा करण्यात आलेली आहे. सदर हत्या मंदिराची जमीन हडपण्याच्या उद्देशाने अत्यंत निघृणपणे करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारच्या वतीने अत्यंत दिरंगाईने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरण दडपविण्यासाठी ही आत्महत्या भासविण्यासाठी चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. या हत्याने राजस्थान सह देशभरताील ब्राह्मण समाजात रोष व्यक्त होत आहे. सदर प्रकरणाची तपासणी निपक्ष होण्याची मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीने होऊ लागली आहे. सदर मागणीसाठी निलंगा येथील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये ब्राह्मण समाजावर जातीय द्वेषातून सातत्याने अपमानजनक व जातीवाचक टिका-टिपन्नी होऊ लागलेली आहे. त्याचबरोबर समाजातील अनेकांना या टिका-टिपन्नीतील शाररीक व मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी अॅट्रासिटी कायद्यात तरतुद करून ब्राह्मण समाजाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करून याबाबत संबंधीत यंत्रणेने समाजाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करावा आणि समाजाची ही बाब शासनापर्यंत पोहचवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर निवेदनावर अॅड अनंतराव सबनिस,माधवाचार्य पिंपळे, अविनाश धोडदेंव, प्रल्हाद पाटील,संजय पिंपळे, अॅड. प्रसाद पिंपळे, अॅड. जयंत देशपांडेअनिकेत सबनीस, अनिकेत कुलकर्णी,विश्र्वास नाईक, अण्णाराव सबनीस, श्रीपाद पिंपळे, प्रमोद मुनी, संजय नाईक, गजानन वाघ, निळकंठ निटूरकर, घनश्याम देशपांडे, अर्थव कुलकर्णी, अॅड.सतिष सबनीस, श्रीपाद कुलकर्णी,मुकुंद कुलकर्णी ,उपेद्र काशीकर, अनिकेत कुलकर्णी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image