मतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन

मतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे


व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन


 


लातूर,- 234 लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघ व 235 लातूर शहर विधानसभा मतदार संघातील सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीचे पुर्नरिक्षण कार्यक्रम (मतदार यादीतील नाव वगळणे/ समाविष्ठ करणे/ दुरुस्ती) सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे ज्या मतदारांचा फोटो मतदार यादीत नाही ते मतदार मागील अनेक वर्षापासून सदर पत्त्यावर राहत नाही तसेच काही मतदार मयत झाल्याबाबत अहवाल बी.एल. ओ. यांनी या कार्यालयात दाखल केलेले आहेत. जे मतदार मयत झालेले आहेत जे मतदार दिलेल्या पत्तयावर आढळून आलेले नाहीत अशांचा बी.एल.ओ मार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार मतदार नोंदणी नियम 1960 चे नियम 21 (अ) नुसार सदर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया आयोगाच्या कार्यपध्दतीप्रमाणे करण्यात येणार आहे.


  तरि नावे वगळण्यात येणाऱ्या मतदारांची यादी ही जिल्हा निवडणूक अधिकारी लातूर यांचे कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय लातूर, तहसील कार्यालय लातूर,पंचायत समिती कार्यालय, लातूर, सर्व मतदार केंद्र या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येत असून ज्या मतदारांची फोटो नाहीत त्यांनी त्यांचे फोटो व सदरील यादीतील नाव वगळण्यास आक्षेप असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा लेखी आक्षेप मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO)व निवडणूक विभाग तहसील कार्यालय लातूर येथे हे वृत्त प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसांत दाखल करावे. अन्यथा कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास मतदार नोंदणी नियम 1960 चे नियम 21 (अ ) नुसार कार्यवाही अनुसरण्यात येईल याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी स्वप्निल पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.


 


टिप्पण्या
Popular posts
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा