अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत •लातूर जिल्ह्यात 97 कोटी 49 लाख 67 हजार मदत

 



अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत

•लातूर जिल्ह्यात 97 कोटी 49 लाख 67 हजार मदत

लातूर :- माहे ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना उर्वरित मदतीचे वाटप करण्यासाठी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक सीएलएस-2021/ प्र.क्र. 258/म-3, दिनांक 21 ऑक्टोबर, 2021 अन्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार उर्वरित आवश्यक निधी लेखाशिर्ष 22452452 अंतर्गत रुपये 66 कोटी 58 लाख 22 हजार व लेखाशिर्ष 22452309 अंतर्गत रुपये 30 कोटी 91 लाख 45 हजार याप्रमाणे एकूण रक्कम 97 कोटी 49 लाख 67 हजार इतका निधी संबंधित तहसीलदारांना वितरीत करण्यात आलेला आहे.
लातूर तालुक्यासाठी 15 कोटी 92 लाख 4 हजार , औसा तालुक्यासाठी 17 कोटी 35 लाख 37 हजार, रेणापूर तालुक्यासाठी 9 कोटी 37 लाख 36 हजार, निलंगा तालुक्यासाठी 17 कोटी 74 लाख 24 हजार , शिरुर अनंतपाळ तालुक्यासाठी 3 कोटी 82 लाख 29 हजार , देवणी तालुक्यासाठी 3 कोटी 88 लाख 76 हजार, उदगीर तालुक्यासाठी 8 कोटी 46 लाख 12 हजार, जळकोट तालुक्यासाठी 4 कोटी 35 लाख 55 हजार, अहमदपूर तालुक्यासाठी 6 कोटी 80 लाख 19 हजार , चाकूर तालुक्यासाठी 9 कोटी 77 लाख 75 हजार असे जिल्ह्यात एकूण 97 कोटी 49 लाख 67 हजार इतका निधी संबंधित तहसीलदारांना वितरीत करण्यात आलेला आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज