उदयगिरीत अ. भा. म. सा.संमेलनानिमित्त साहित्यिकांची बैठक संपन्न


 उदयगिरीत अ. भा. म. सा.संमेलनानिमित्त साहित्यिकांची बैठक संपन्न 

 उदगीर : ( दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ ) ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच उदगीर तालुक्यातील साहित्यिकांशी संमेलनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठीची नियोजन बैठक महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, 'मसाप'चे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे, सदस्य डॉ. प्रकाश देशपांडे, प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, प्रा. जे.आर.कांदे, प्रा. श्रीराम चामले, ज्योती डोळे, एकनाथ राऊत, प्रा. राजपाल पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ.आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांची उपस्थिती होती. 

           संमेलन संस्मरणीय होण्यासाठी प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव, प्रा. डॉ. सुरेश शिंदे, प्रतिभा मुळे, प्रा. महादेव खताळ, प्रा. डॉ. नरसिंग कदम, गोविंद सावरगावे, डॉ. संजय कुलकर्णी, अंबादास केदार, ऍड. महेश मळगे, युवराज धोत्रे, डॉ. प्रकाश देशपांडे, अश्विनी निवर्गी, शिवकुमार डोईजोडे, प्रीती शेंडे, व्ही .एस.कुलकर्णी, ज्योती डोळे, प्रगती संगुळगे यांनी चर्चेत सहभाग घेऊन विधायक सूचना केल्या. यावेळी नाशिक येथील संतोष हुदळीकर यांनी बालकुमार साहित्य मेळाव्याच्या आयोजनासाठी सर्वांनी मनापासून कल्पकतेने, क्षमता वापरून काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अंबरखाने म्हणाले, उदगीरच्या संमेलनात अनेक ज्वलंत व लोकोपयोगी विषयावर कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. तिरुके म्हणाले, साहित्य संमेलनाचे स्वरूप व्यापक होण्यासाठी लोकसहभागाचा उपक्रम महाविद्यालय राबवत आहे. याकामी सर्व साहित्यिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून, विविध समित्यांमध्ये सहभागी होऊन संमेलन यशस्वीतेसाठी ऐतिहासिक कार्य पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात नागराळकर म्हणाले, साहित्यिकांच्या बैठकीमध्ये विधायक झालेली चर्चा ही साहित्य संमेलनाच्या यशाची नांदी आहे. साहित्य संमेलनात सर्वांना सहभागी करून सन्मान राखण्यासाठी प्रयत्न केला जात असून प्रतिभावंतांना संधी दिली जाणार आहे. हे साहित्य संमेलन 'आपले' आहे, अशी भावना ठेवून सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'मसाप'चे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी.बी. बळवंत यांनी तर आभार प्रा. एस. बी. येडले यांनी मानले.

टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज