उदयगिरीत अ. भा. म. सा.संमेलनानिमित्त साहित्यिकांची बैठक संपन्न


 उदयगिरीत अ. भा. म. सा.संमेलनानिमित्त साहित्यिकांची बैठक संपन्न 

 उदगीर : ( दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ ) ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच उदगीर तालुक्यातील साहित्यिकांशी संमेलनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठीची नियोजन बैठक महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, 'मसाप'चे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे, सदस्य डॉ. प्रकाश देशपांडे, प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, प्रा. जे.आर.कांदे, प्रा. श्रीराम चामले, ज्योती डोळे, एकनाथ राऊत, प्रा. राजपाल पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ.आर .आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांची उपस्थिती होती. 

           संमेलन संस्मरणीय होण्यासाठी प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव, प्रा. डॉ. सुरेश शिंदे, प्रतिभा मुळे, प्रा. महादेव खताळ, प्रा. डॉ. नरसिंग कदम, गोविंद सावरगावे, डॉ. संजय कुलकर्णी, अंबादास केदार, ऍड. महेश मळगे, युवराज धोत्रे, डॉ. प्रकाश देशपांडे, अश्विनी निवर्गी, शिवकुमार डोईजोडे, प्रीती शेंडे, व्ही .एस.कुलकर्णी, ज्योती डोळे, प्रगती संगुळगे यांनी चर्चेत सहभाग घेऊन विधायक सूचना केल्या. यावेळी नाशिक येथील संतोष हुदळीकर यांनी बालकुमार साहित्य मेळाव्याच्या आयोजनासाठी सर्वांनी मनापासून कल्पकतेने, क्षमता वापरून काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अंबरखाने म्हणाले, उदगीरच्या संमेलनात अनेक ज्वलंत व लोकोपयोगी विषयावर कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. तिरुके म्हणाले, साहित्य संमेलनाचे स्वरूप व्यापक होण्यासाठी लोकसहभागाचा उपक्रम महाविद्यालय राबवत आहे. याकामी सर्व साहित्यिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून, विविध समित्यांमध्ये सहभागी होऊन संमेलन यशस्वीतेसाठी ऐतिहासिक कार्य पार पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात नागराळकर म्हणाले, साहित्यिकांच्या बैठकीमध्ये विधायक झालेली चर्चा ही साहित्य संमेलनाच्या यशाची नांदी आहे. साहित्य संमेलनात सर्वांना सहभागी करून सन्मान राखण्यासाठी प्रयत्न केला जात असून प्रतिभावंतांना संधी दिली जाणार आहे. हे साहित्य संमेलन 'आपले' आहे, अशी भावना ठेवून सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'मसाप'चे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी.बी. बळवंत यांनी तर आभार प्रा. एस. बी. येडले यांनी मानले.

Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image