उदयगिरीत अ. भा. म. साहित्य संमेलनानिमित्त मुख्याध्यापकांची बैठक संपन्न

 उदयगिरीत अ. भा. म. साहित्य संमेलनानिमित्त मुख्याध्यापकांची बैठक संपन्न 


मुख्याध्यापकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आयोजक संस्थेला संमेलन यशस्वितेचा आला विश्वास
उदगीर : ( दिनांक १० फेब्रुवारी २०२२ ) ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उदगीर परिसरातील जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळातील मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद उदगीरचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा .मनोहर पटवारी, सदस्य ऍड. प्रकाश तोंडारे, पंचायत समिती सभापती प्रा. डॉ. शिवाजी मुळे, गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर .के .मस्के, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, संतोष हुदळीकर यांची उपस्थिती होती. या बैठकीस मुख्याध्यापकांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी प्रा. पटवारी म्हणाले, साहित्य संमेलनात सर्वांचा सहभाग अपेक्षित असून त्यासाठी परिश्रम करावे लागतील. हुदळीकर म्हणाले, संमेलनात बालकुमार साहित्यिकांचा मेळावा अनोखा उपक्रम होणार आहे. विद्यार्थ्यांची संमेलनाशी नाळ जोडण्यासाठी प्रयत्न व्हावेत. साहित्य संमेलन संस्मरणीय होण्यासाठी रामदास केदार, धनंजय गुडसूरकर, ज्ञानेश्वर नकूरे, प्रतिभा मुळे, प्रा.जे.आर. कांदे, प्रा. डॉ. आर .के. मस्के यांनी विधायक सूचना मांडल्या. सभापती प्रा. शिवाजी मुळे म्हणाले, साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी कार्यक्षमतेने काम करून आपल्या परिसराचा लौकिक वाढवावा. समारोपात नागराळकर म्हणाले, भावी पिढी सुसंस्कृत होण्यासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाचे निमित्त साधून साहित्य संमेलनाचे आयोजन सर्वांना सोबत घेऊन केले जाणार असून त्यात सर्वांचा सक्रिय सहभाग असावा. आपल्या सर्वांच्या सहभागाने हे संमेलन 'आपले' व्हावे, अशी भावना व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी तर आभार रामचंद्र तिरुके यांनी मानले. यावेळी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अंजली स्वामी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image