इनरव्हील क्लब उदगीर तर्फे बाल मावळ्यांसोबत शिवजयंती दणक्यात साजरी

 

इनरव्हील क्लब उदगीर तर्फे बाल मावळ्यांसोबत शिवजयंती दणक्यात साजरी

पोवाडा व वेशभूषा स्पर्धा

उदगीर : शिवजयंती आपल्या मानाचा, अभिमानाचा आणि आपले जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव.जय भवानी! जय शिवराय !
शिवरायांचे नाव घेताच अंगात उत्साह येतो ,जोश येतो अंगातील रक्त उसळून येतं काय आहे या नावाची जादू ?हे कोणत टाॅनिक आहे जे वर्षानुवर्षे युगेयगे समजाला प्रेरित करत आहे. ही प्रेरणा आहे त्यांच्या कर्तृत्वाची, शौर्याची, औद्यार्याची,धाडसाची
आज कालच्या पिढीला शिवरायांचा इतिहास वाचून, ऐकून माहिती आहे पण हा इतिहास या बाल गोपालांनी स्वतः समजून उमजून घ्यावा.शिवस्तुती त्यांनी आपल्या निरागस आवाजातून वर्णन करावी यासाठी इनरव्हील क्लब उदगीरने सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय उदगीर येथे पोवाडा व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता
प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब तर्फे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अपर्णा पटवारी(उपाध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय) होत्या. याच बरोबर मंचावर अध्यक्ष (सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय)भगवानराव वट्टमवार कार्यवाह (सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय)अंबादासराव देशमुख इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ मीरा चंबुले, उपाध्यक्ष सौ स्वाती गुरुडे, सचिव सौ शिल्पा बंडे, कोषाध्यक्ष सौ मानसी चन्नावार ,एडिटर सौ पल्लवी मुक्कावार,आय ओ एस सौ स्नेहा चणगे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रोजेक्ट प्रमुख होत्या सौ उषा कुलकर्णी प्राचार्या मातृभूमी महाविद्यालय, उदगीर हा कार्यक्रम अतिशय थाटात सुंदर,भव्य दिव्य पध्दतीने पार पडला यासाठी सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयातील संस्थेचे सर्व पदाधिकारी, मराठी विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी,सेमी विभाग प्रमुख सौ आशा बेंजरगे सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.पालकांचा ही खूप उस्फुर्तपणे सहभाग व उपस्थिती होती.चिमुकल्यांनी अतिशय सुरेख वेशभूषा व पोवडा सादर केला.
सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत असते
या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजच्या गोंडस रूपात शिवरायांचे व बाळमावळ्यांचे तेज दिसत होते. असे मत इनरव्हील क्लब उदगीरच्या उपाध्यक्षा सौ स्वाती गुरुडे यांनी व्यक्त केले.

शिवजयंती निमित्त इनरव्हील क्लब उदगीर तर्फे शिवरायांना दिलेल्या या मानवंदनचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image