इनरव्हील क्लब उदगीर द्वारा कर्करोग जन जागृती शिबिराचे मंगलाय हाॅस्पिटल मध्ये आयोजन......

 इनरव्हील क्लब उदगीर द्वारा कर्करोग जन जागृती शिबिराचे मंगलाय हाॅस्पिटल मध्ये  आयोजन......



दिनांक ४ फेब्रुवारी कर्करोग जागृती दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब उदगीर तर्फे कर्करोग जन जागृती शिबिराचे मंगलाय हाॅस्पिटल येथे आयोजन करण्यात आले .  कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंगलाय हाॅस्पिटलच्या डॉ सुप्रिया जगताप यांनी कर्करोग लक्षणे , कर्करोग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी या विषयी सध्या सोप्या भाषेत , सुंदर असे मार्गदर्शन केले. रक्ताचा कर्करोग, महिलांमधील काही प्रकारचे कर्करोग या विषयी सविस्तर माहिती सांगितली. पौष्टिक आहार , नियमित व्यायाम केला पाहिजे कर्करोगाची काही प्राथमिक लक्षणे दिसताच तपासणी करून घेतली पाहिजे कर्करोग बरा होऊ शकतो त्याची भिती न बाळगता लवकरात लवकर उपचार घेतले पाहिजे असे डॉ सुप्रिया जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले याच बरोबर कर्करोग होऊ नये म्हणून लस  उपलब्ध आहेत  वयाच्या काही मर्यादेत ती लस घेऊन आपण सुरक्षित राहू शकतो असे ही त्या म्हणाल्या . इनरव्हील क्लब उदगीर तर्फे करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे  त्यांनी कौतुक केले 

या वेळी कर्करोग जन जागृती साठी इनरव्हील क्लब उदगीर तर्फे हाॅस्पिटलमध्ये सर्वत्र या आजारांची लक्षणे,उपाय, खबरदारी या बद्दल पोस्टर लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ मीरा चंबुले, उपाध्यक्ष सौ स्वाती गुरुडे, कोषाध्यक्ष सौ मानसी चन्नावार, एडिटर सौ पल्लवी मुक्कावार,आय. एस. ओ सौ स्नेहा चणगे याच बरोबर सदस्य सौ राखी सुगंधी,सौ पुजा गर्जे,सौ अश्विनी देशमुख आणि मंगलाय हाॅस्पिटलच्या सर्व कर्मचारींची उपस्थिती होती. डॉ सुप्रिया जगताप आणि मंगलाय हाॅस्पिटल यांनी खूप मोलाची साथ मिळाली.

Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image