सायकलिंग ग्रुपच्या माध्यमातून गावोगावी साहित्य संमेलनाचा प्रचार व प्रसार 50 जणांची टीम लागली कामाला

सायकलिंग ग्रुपच्या माध्यमातून गावोगावी साहित्य संमेलनाचा प्रचार व प्रसार

50 जणांची टीम लागली कामाला



उदगीर : सदैव विविध समाजकार्यात कार्यरत असलेल्या उदगीर येथील सायकलिंग ग्रुपच्या वतीने उदगीर येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा गावोगावी जाऊन प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज दि. 27 मार्च रोजी शिवाजी चौकात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, डॉ. श्रीकांत मधवरे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, सायकलिंग ग्रुपचे प्रमुख विवेक होळसंबरे उपस्थित होते.
उदगीर येथे दि. 22, 23 व 24 एप्रिल रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून हे संमेलन ग्रामीण भागात पोहोचावे याकरिता उदगीर येथील सायकलिंग ग्रुपच्या वतीने गावोगावी जाऊन या संमेलनाचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. या ग्रुप मध्ये विवेक होळसंबरे यांच्यासह अनिरुद्ध जोशी, सुनिल ममदापूरे, अतुल वाघमारे, जगदिश पंडित, बालाजी इंद्राळे, नागनाथ वारद, दिपक पाटील, रामेश्वर सोनी, कपिलदेव कल्पे , कपिल वट्टमवार, ज्ञानेश्वर चंडेगावे, सतीष चवळे, गणेश कांबळे, डॉ. गजानन टिपराळे, दत्तात्रय आडके, संदीप आडके, डॉ. मनोज कामशेट्टे, सुशीलकुमार पांचाळ, मुकेश कुलकर्णी, नवनाथ मोरखंडे, नारायण पोले, सतीष पाटील, डॉ प्रविण मुंदडा, कांचनकुमार केंद्रे, परमेश्वर बिरादार, प्रसाद जालनापूरकर यांच्यासह 50 जणांचा समावेश आहे. ही टीम रोज सकाळी विविध गावात जाऊन संमेलनासंदर्भात माहिती सांगून विद्यार्थ्यासह अबाल वृद्धांना या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहे.
Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image