जि. प.शाळेत साहित्य संमेलनाचा प्रचार: विद्यार्थी कवितेत रंगले......


जि. प.शाळेत साहित्य संमेलनाचा प्रचार: 

विद्यार्थी कवितेत रंगले......

उदगीर: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय , उदगीर येथे दि.२२ते२४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाच्या प्रचारार्थ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानवडा ता.औसा येथे शब्दपंढरी प्रतिष्ठान,लातूर तर्फे "कविता आपल्या भेटीला" हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास शब्दपंढरी प्रतिष्ठानचे योगिराज माने,दयानंद बिराजदार,विश्वंभर इंगोले व नामदेव कोद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक जगन्नाथ पांढरे, दयानंद तळेकर,एकनाथ सोमवंशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी दयानंद बिराजदार यांनी करून "इवल इवल तुझं पाऊल शाळेत पडलं.. मायीच्या चेह-यावर चांदणं गोंदलं"या काव्यपंक्ती सादर करताच लेकरांच्या अंगात उत्साह संचारला..
नामदेव कोद्रे यांनी "चला उदगीरला जाऊ,मेळा साहित्याचा पाहू..
ग्रंथ दिंडी पालखीला,सारे खांद्यावर घेऊ" या ओळी सादर करून लेकरांना साहित्य संमेलनास येण्याचे निमंत्रण दिले.
विश्वंभर इंगोले यांनी "मित्रा आता मोबाइलवर गेम खेळणे टाळू.. चला जरासे आनंदाने मैदानावर खेळू" या कवितेतून लेकरांना खेळाचे महत्व पटवून दिले..
योगिराज माने यांनी "गम्माडी गंमत करू या.. फुलपाखरू धरू या"असे म्हणताच सा-या लेकरांची नजर फुलपाखरांना शोधू लागली.
अनिता कुर्लकर,मीरा कुलकर्णी ,ज्योती मादळे,रचना पुरी यांच्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
कवयित्री शोभा माने यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन केले.मंदाकिनी उकादेवडे यांनी आभारप्रदर्शन केले.
Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image