माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांच्यासह अनेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

 माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांच्यासह अनेकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश


निलंगा: निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांच्यासह निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी व 100 कार्यकर्ते यांचा आज मुंबई येथे गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
निलंगा पंचायत समिती माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, चक्रधर शेळके युवक प्रदेश सरचिटणीस, सौ स्वाती जाधव प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा भाजप, विलास लोभे माजी प स सदस्य, वामन लिंबराज जाधव ताजपुर, वाडीकर भानुदास, शिंदे बालाजी, शेख इस्माईल, मुजीब सौदागर, सब्दर कादरी, (टिपू सुलतान संघटना) रामलिंग पटसळगे, ऍड. मनोज अलमले, ऍड. सुनील माने, ऍड. प्रवीण नरहरे, बोलशेट्टे मनीषा लिंगायत शिवा संघटना महिला जिल्हाध्यक्ष यांच्यासह 100 जणांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, वैद्यकीय शिक्षण मंत्री व लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख, युवक क्रीडा मंत्री सुनील केदार, आमदार धिरज देशमुख, आमदार राजेश राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, काँग्रेसचे सचिव अभय साळुंके यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
या प्रसंगी लातुर जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, सचिन दाताळ, निलंगा तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील , दयानंद चोपणे, आदी उपस्थित होते.
Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image