ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे..... सहाय्यक जिल्हाधिकारी जिथिन रेहमान.

 ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे.....

 सहाय्यक जिल्हाधिकारी  जिथिन रेहमान.  



निलंगा :-  ग्राहकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी शासनाने  " ग्राहक संरक्षण कायदा " अंमलात आणला असून ग्राहकाने कुठल्याही  आमिषाला बळी न पडता ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांबाबत जागरुक राहून दैनंदिन व्यवहार पूर्ण करावेत असे आवाहन  भारतीय प्रशासन सेवेतील  सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार जिथिन रेहमान  यांनी केले.   


निलंगा येथे तहसील कार्यालयाच्या वतीने गुरुवार दि. 17 मार्च रोजी आयोजित जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव  होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे , पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ , भुमी अभिलेख उपाधीक्षक अविनाश मिसाळ ,ग्राहक मंचाचे ॲड. नारायण सोमवंशी , सुधीर पुरी, विवेकानंद वाडीकर , गटविकास अधिकारी अमोल ताकभाते,नायब तहसीलदार अरुण महापुरे , रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील आदी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 पुढे बोलताना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार जिथिन रेहमान म्हणाले की , दैनंदिन व्यवहारात वावरत असताना प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. प्रत्येक ग्राहकाला वस्तूच्या सुरक्षिततेचा हक्क जाणून घेण्याचा , वस्तूबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा, वस्तू निवडण्याबाबतचा, वस्तूबाबत  आपले म्हणणे मांडण्याचा , वस्तू बाबत तक्रार करण्याचा  व तक्रार निवारण करून घेण्याचा प्रत्येक ग्राहकाला हक्क असतो. म्हणून ग्राहकांनी त्यांना असलेल्या हक्कांबाबत व अधिकाराबाबत जागरूक राहून कार्य करावे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी शोभा जाधव म्हणाल्या प्रत्येक व्यक्ती वस्तूंच्या आकर्षणास भुलतो ही मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे ग्राहकांनी विविध वस्तूंच्या जाहिरातबाजी व त्याबाबतच्या विविध सवलती यांना बळी न पडता वस्तूची खरेदी करावी. जगात काहीच फुकट मिळत नाही म्हणून ग्राहकाने ब्रँडच्या मागे न लागता वस्तूची आवश्यकता व गरज लक्षात घेऊन  खरेदी करावी.यावेळी बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे म्हणाले की ग्राहक ही संकल्पना व्यापक आहे. ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यास ग्राहकाने तातडीने संबंधित विभागाकडे व पोलीस खात्याच्या सायबर सेलकडे चोवीस तासांच्या आत तक्रार नोंदवावी असे आव्हान केले. याप्रसंगी ग्राहक मंचाचे ॲड. नारायण सोमवंशी,किशन मोरे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केले. सूत्रसंचालन श्रीशैल बिराजदार यांनी केले तर आभार नायब तहसीलदार अरुण महापुरे यांनी मानले.

Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image