ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे..... सहाय्यक जिल्हाधिकारी जिथिन रेहमान.

 ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे.....

 सहाय्यक जिल्हाधिकारी  जिथिन रेहमान.  



निलंगा :-  ग्राहकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी शासनाने  " ग्राहक संरक्षण कायदा " अंमलात आणला असून ग्राहकाने कुठल्याही  आमिषाला बळी न पडता ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांबाबत जागरुक राहून दैनंदिन व्यवहार पूर्ण करावेत असे आवाहन  भारतीय प्रशासन सेवेतील  सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार जिथिन रेहमान  यांनी केले.   


निलंगा येथे तहसील कार्यालयाच्या वतीने गुरुवार दि. 17 मार्च रोजी आयोजित जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव  होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे , पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ , भुमी अभिलेख उपाधीक्षक अविनाश मिसाळ ,ग्राहक मंचाचे ॲड. नारायण सोमवंशी , सुधीर पुरी, विवेकानंद वाडीकर , गटविकास अधिकारी अमोल ताकभाते,नायब तहसीलदार अरुण महापुरे , रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील आदी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 पुढे बोलताना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार जिथिन रेहमान म्हणाले की , दैनंदिन व्यवहारात वावरत असताना प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो. प्रत्येक ग्राहकाला वस्तूच्या सुरक्षिततेचा हक्क जाणून घेण्याचा , वस्तूबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा, वस्तू निवडण्याबाबतचा, वस्तूबाबत  आपले म्हणणे मांडण्याचा , वस्तू बाबत तक्रार करण्याचा  व तक्रार निवारण करून घेण्याचा प्रत्येक ग्राहकाला हक्क असतो. म्हणून ग्राहकांनी त्यांना असलेल्या हक्कांबाबत व अधिकाराबाबत जागरूक राहून कार्य करावे असे ते म्हणाले. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी शोभा जाधव म्हणाल्या प्रत्येक व्यक्ती वस्तूंच्या आकर्षणास भुलतो ही मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे ग्राहकांनी विविध वस्तूंच्या जाहिरातबाजी व त्याबाबतच्या विविध सवलती यांना बळी न पडता वस्तूची खरेदी करावी. जगात काहीच फुकट मिळत नाही म्हणून ग्राहकाने ब्रँडच्या मागे न लागता वस्तूची आवश्यकता व गरज लक्षात घेऊन  खरेदी करावी.यावेळी बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे म्हणाले की ग्राहक ही संकल्पना व्यापक आहे. ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यास ग्राहकाने तातडीने संबंधित विभागाकडे व पोलीस खात्याच्या सायबर सेलकडे चोवीस तासांच्या आत तक्रार नोंदवावी असे आव्हान केले. याप्रसंगी ग्राहक मंचाचे ॲड. नारायण सोमवंशी,किशन मोरे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केले. सूत्रसंचालन श्रीशैल बिराजदार यांनी केले तर आभार नायब तहसीलदार अरुण महापुरे यांनी मानले.

टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज