शास्री विद्यालयात संमेलन आपल्या दारी उपक्रम. गुडसूरकर यांच्या कथा सादरीकरणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध.

 शास्री विद्यालयात संमेलन आपल्या दारी उपक्रम. 


गुडसूरकर यांच्या कथा सादरीकरणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध. 



उदगीर : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने संमेलन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत गुरूवारी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांचा कथा कथन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी धर्म्या ही कथा सादर करून विद्यार्थ्यांसह शिक्षकांना ही मंत्रमुग्ध केले. 
येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ९५ वे संमेलन: ९५ कथाकथन या उपक्रमातून संमेलन गावपातळीवर पोहोचविण्याचा मानस आयोजक संस्थेचा असून या उपक्रमांतर्गत गुरूवारी शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात संमेलन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड होते. तर व्यासपीठावर धनंजय गुडसूरकर, रसूल पठाण, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, पर्यवेक्षक बलभीम  नळगीरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविक रसूल पठाण यांनी केले. आभार निता मोरे यांनी मानले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी ,जि.प.प्रा.शा.तोंडार व नेहरु मेमोरिअल विद्यालय येथे गुंडप्पा पटणे यांचे कथाकथन झाले.प्रा.डॉ .स्मिता लखोटीया,केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे,तृप्ती मुंदडा हे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी बालमेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे यांनी केले.राजर्षी शाहू विद्यालयात रमाकांत बनशेळकीकर यांचे कथाकथन झाले.सुवर्णमाता देशमुख कन्या विद्यालयात दीपक बलसूरकर यांचे कथाकथन झाले.'संमेलन आपल्या दारी'या उपक्रमात कथाकथनाचे उपक्रम चालू आहेत.
टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
राजकीय इच्छाशक्ती असल्यास काहीच अशक्य नाही : संजय बनसोडे उदगीर : नेतृत्व करणाऱ्या नेत्यामधील राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटत असून ही राजकीय इच्छाशक्ती असल्यास मतदार संघाच्या विकासात कुठलीच अडचण येणार नसल्याचे प्रतिपादन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. सोमनाथपुर ता. उदगीर येथील गोरक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या प्रकल्पाअंतर्गत गाईसाठी नवीन शेड चे भूमिपूजन, पर्यावरणपूरक गोकास्टचे उद्घाटन, जलकुंभाचे जलपूजन आदी कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, डॉ . अनिल भिकाने, पंचायत समितीच्या सदस्या सारजाबाई पाटील, डॉ. भास्कर बोरगावकर, गोरक्षणचे अध्यक्ष डॉ. आर. एन. लखोटीया उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री बनसोडे म्हणाले की, आपण पाच वर्षात उदगीरचा कायापालट करणार असून उदगीरकरांना येत्या डिसेंबर पर्यंत लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार आहे. राज्य शासनाच्या गडसंवर्धन योजनेत उदगीर किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून उदगीरच्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासकीय इमारत मंजूर झाली आहे लवकरच या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगत गोरक्षणचे गायींच्या संवर्धनासाठी केले जाणारे काम गौरवास्पद असून आगामी काळात या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रकल्प उभारावा त्यासाठी शासनस्तरावर आपण सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. सतीश केंद्रे, महादेव नौबदे, प्रा. एस. एस. पाटील, दीपक बलसुरकर, मीनाक्षी स्वामी, के. एस. स्वामी, उपअभियंता संजय देशपांडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. एन. लखोटीया यांनी केले, सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले. आभार सुबोध अंबेसगे यांनी मानले.
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे : स्वाती हुडे यांना दिलासा