प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव

प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव



उदगीर : गेल्या वीस वर्षांपासून उदगीर मतदार संघात काम करीत असताना जी प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी आपल्यासोबत जोडली गेली अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करीत असल्याची माहिती सुधाकर भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा मागच्या काही दिवसांपासून जोर धरत होती. आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीर विधानसभा मतदार संघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची अधिक शक्यता असल्याने आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही याची खात्री असल्याने माजी आमदार सुधाकर भालेराव हे लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून च पक्षांतराच्या प्रयत्नात असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून पक्षाच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे माजी आ. भालेराव हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला बळ मिळत होते. 

दि. 11 जुलै 2024 रोजी माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश होणार आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी माजी आ.भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षातआपल्यामुळे काही नेत्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. आपण गेल्या वीस वर्षांपासून उदगीर विधानसभा मतदार संघात काम करीत असून हजारो प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी आपल्याशी जोडली गेली आहे. ही कार्यकर्त्यांची फळी आजही आपल्यासोबत प्रामाणिकपणे काम करण्यास तयार असून अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत आपण त्या पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याचे माजी आमदार भालेराव म्हणाले.

टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज